विदर्भाच्या पूर्व भागाला फार वर्षांपासून शालीमंडळ असे संबोधले जाते. महाकवी महिमा भट्ट यांनी १२ व्या शतकात महानुभव पंथाचे प्रणेते श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर लीळाचरित्र लिहिले आहे.
महाराष्ट्राची पूर्व सीमा कथन करताना आपल्याला प्रथम आठवतो गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा तसेच भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. भारतात प्रसिद्ध असलेल्या गारियाबंद जंगल आणि नागझिरा अभयारण्याच्या सीमेलगत असलेले अंभोरा हे गाव गोंदिया तालुक्यापासून ७ कि.मी. अंतरावर आहे.
संत तुकडोजी महाराजांच्या "आदर्श गाव" संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारे अंभोरा
अंभोरा गावात या संकल्पनेचे मूर्त स्वरूप पाहायला मिळते. गावातील सर्वजण एकत्र येऊन दरवर्षी नाटक सादर करतात. सांस्कृतिक कलांची जोपासना करण्याची परंपरा येथे कायम आहे.
आमच्या अंभोरा गावात कोणत्याही प्रकारची जातीय भेदभाव नाही हे आम्ही अभिमानाने सांगतो. इथे दलित आणि गैर-दलित यांची घरे शेजारी असून सर्वजण परस्पर सहकार्याने व सद्भावनेने जीवन व्यतीत करतात.
गावात दिवाळीच्या वेळी भरणारी मंडई ही ग्रामीण परंपरा आणि कलात्मक आविष्काराचे केंद्र आहे. तसेच आंबेडकर जयंती, महात्मा गांधी जयंती, एक गाव - एक गणपती, दर्गा उत्सव, ईद इत्यादी उत्सव सहकार्याने व सहकार्यात पार पडतात.
आधुनिक सरस्वतीच्या रूपात सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन गावातील सर्व मुले-मुली नियमितपणे शाळेत जातात. लोकसहभागातून १ लाख रुपये जमा करून शाळा डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मुलगा आधुनिक तंत्रज्ञानाची जवळीक साधत असून बौद्धिक व कौशल्य विकास साधत आहे.
ग्रामपंचायत स्तरावर बचत गटांना प्रशिक्षण, श्रमदान, बंधारे बांधणे, गांडूळ खत निर्मिती, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, स्वच्छता आणि शौचालयांचे महत्त्व पटवून देणे अशा विविध योजना राबवल्या जातात.
संत तुकडोजी महाराजांच्या वचनानुसार:
"प्रामाणिकपणे करणे काम | हेच आमुचे ईश्वरनाम ||
सर्व जीवांमानसी ऐक्य प्रेम | धर्म हा अमुचा ||"